---Advertisement---

भारताची पाकिस्तानवरील कारवाई योग्यच, अमेरिकेच्या परराष्ट्र व्यवहार समितीच्या अध्यक्षांचे प्रतिपादन

---Advertisement---

काश्मिरातील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानातील दहशतवादी अड्डयांवर केलेली कारवाई योग्यच आहे. जेव्हा तुमच्या नागरिकांवर हल्ला होतो तेव्हा त्या हल्ल्याला प्रत्युत्तर देण्याशिवाय पर्याय नसतो. जगात शांतता राहावी यासाठी दहशतवादाचा खात्मा आवश्यक असल्याचे मत अमेरिकेच्या परराष्ट्र व्यवहार समितीचे अध्यक्ष ब्रायन मास्ट यांनी व्यक्त केले.

अमेरिकेच्या दौऱ्यावर असलेल्या काँग्रेस नेते शशी थरूर यांच्या नेतृत्वातील भारताच्या सर्वपक्षीय शिष्टमंडळाने भारतीय शिष्टमंडळाने अमेरिकेच्या परराष्ट्र व्यवहार समितीचे अध्यक्ष ब्रायन मास्ट, समिती सदस्य ग्रेगरी मीक्स, खासदार कमलागर डोव्ह आणि खासदार बिल हझेंगा यांची भेट घेतली. अमेरिकेतील दोन्ही राजकीय पक्षांच्या सदस्यांनी पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा निषेध केला आणि दहशतवादी हल्ल्याविरुद्ध भारताच्या प्रत्युत्तराचे समर्थन केले.

यावेळी मास्ट म्हणाले, भारत आणि अमेरिकेचे संबंध खूप चांगले आहेत आणि भविष्यात दोन्ही देशांमधील संबंधांमध्ये खूप विकास आणि विस्तार होण्याची शक्यता आहे. दहशतवादाविरुद्ध आपल्याला एकत्र काम करावे लागेल जेणेकरून दहशतवादी पुन्हा कोणत्याही देशावर असा हल्ला करू शकणार नाही. डोव्ह यांनीही पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा निषेध केला आणि भारत आणि पाकिस्तानमधील युद्धबंदीला पाठिंबा दिला.

आम्हाला कुणाच्या मध्यस्थीची गरज नाही : थरूर

काँग्रेस खासदार शशी थरूर म्हणाले, पाकिस्तानने दहशतवाद्यांना सोयीसुविधा देणे बंद केल्यास भारत चर्चेसाठी तयार आहे. चर्चा करण्यासाठी भारताला कोणत्याही मध्यस्थ देशाची आवश्यकता नाही. दहशतवादी हल्ले झाल्यास पाकिस्तानला कठोर प्रत्युत्तर दिले जाईल. दोन्ही देशातील संघर्ष थांबविण्यासाठी भारतावर कुणाचाही दबाव नव्हता.

---Advertisement---

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment