---Advertisement---
जळगाव : पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त, जिल्हाधिकारी कार्यालयात त्यांच्या तेलचित्राचे भव्य अनावरण करण्यात आले. या ऐतिहासिक कार्यासाठी धनगर समाजाच्या वतीने जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांचे विशेष आभार व अभिनंदन करण्यात आले.
धनगर समाजाच्या शेकडो वर्षांच्या इतिहासात आणि महाराष्ट्राच्या सामाजिक-सांस्कृतिक परंपरेत राजमाता अहिल्यादेवी होळकर यांचे योगदान अतुलनीय आहे. त्या स्मृती जपणारे चित्र जिल्हाधिकारी कार्यालयात लावल्याने समाजात अत्यंत सकारात्मक भावना निर्माण झाली आहे.
---Advertisement---

या प्रसंगी सकल धनगर समाजाचे विविध पदाधिकारी, प्रतिनिधी, युवा कार्यकर्ते उपस्थित होते. त्यांनी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांना सन्मानचिन्ह देत त्यांचे मनःपूर्वक आभार मानले. सदर प्रसंगी भाजपा महानगर सरचिटणीस तथा दुध संघांचे संचालक अरविंद देशमुख, धनगर समाज महासंघाचे मा. महामंत्री सुभाष सोनवणे, धनगर समाज महासंघाचे प्रदेश उपाध्यक्ष सुभाष करे, मल्हार सेनेचे प्रदेश सरचिटणीस संदीप तेले, धनगर बोर्डिंग चे अध्यक्ष प्रभाकर न्हाळदे,धनगर समाज महासंघाचे जिल्हाध्यक्ष दिलीप धनगर, मल्हार सेनेचे मा. जिल्हाप्रमुख अरुण ठाकरे,डॉ संजय पाटील,धनगर समाज कर्मचारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष गणेश बागुल उपाध्यक्ष तुळशीराम सोनवणे,सरचिटणीस संतोष कचरे,प्रभाकर कवडे,अमोल सपकाळ इत्यादी उपस्थित होते.
दरम्यान, पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त भव्य जागर यात्रा दिनांक 30 मे रोजी जळगाव येथून सुरूवात होणार आहे. ही जागर यात्रा जळगाव येथून निघणारी 300 किलोमीटरची भव्य ‘अहिल्या संदेश जागर यात्रा’ आणि 300 वाहनांचा ताफा हे या ऐतिहासिक यात्रेचं विशेष आकर्षण असणार आहे.
या भव्य यात्रेला सकल धनगर समाजाचा एकमुखी पाठिंबा दिला आहे. प्रमुख मान्यवर व समाजबांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचं आवाहन केलं आहे. या यात्रेच्या माध्यमातून संपूर्ण देशभरात राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या कार्याचा जागर करण्यात येणार आहे.
याप्रसंगी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुद्धा आपल्या अभिवादनातून राजमातांच्या कार्यास उजाळा दिला असून, या जागर मोहिमेला राष्ट्रव्यापी पातळीवर पाठिंबा लाभला आहे. यावेळी धनगर समाजाच्या वतीने भारतीय जनता पक्षाने राबवलेल्या उपक्रमाबद्दल आभार प्रदर्शन करण्यात आले. प्रत्येकाने “एक दिवस समाजासाठी” देत, स्वतःचं एक वाहन घेऊन या ऐतिहासिक यात्रेत सहभागी होण्याचे आवाहन सुभाष सोनवणे, सदाशिवराव ढेकळे, अरविंद देशमुख, सुभाष करे, संदीप तेले, अरुण ठाकरे, दिलीप धनगर, गणेश बागुल, धर्मराज सोनवणे, रामचंद्र चऱ्हाटे, विष्णु ठाकरे, दिलीप नाझरकर, संतोष कचरे, तुळशीराम सोनवणे, प्रवीण धनगर, प्रभाकर कवडे, दिगंबर धनगर, रामचंद्र निळे, डी. बी. पांढरे, गजानन देशमुख , संदीप पवार, सचिन धनगर, रमेश सुशीर, प्रवीण पवार, योगराज चिंचोरे, अनिल मनियार, रितिक ढेकळे, डॉ. विनोद पाटील, संजय ढेकळे यांनी केले आहे.