जळगाव : या वर्षी मान्सूनचे आगमन गेल्या ६८ वर्षांत सर्वात लवकर झाले आहे. यामुळे शेतकऱ्यांना मशागतीला वेळ न मिळाल्याने त्यांची चांगलीच तारांबळ उडाली आहे. दरवर्षीप्रमाणे साधारण ६ ते १० जूनला मान्सूनचे आगमन होत असते, यानुसार शेतकऱ्यांनी पेरणीपूर्व तयारीला प्रारंभ केला होता. परंतु, मान्सूनचा पाऊसाने मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात हजेरी लावल्याचे जिल्ह्यात शेतातील पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले.
जळगाव जिल्ह्यात यावर्षी जवळपास ७ लाख ३९ हेक्टरवर खरिपाची पेरणी होणार आहे. यानुसार कृषी विभागाकडून बि-बियाणे खतांची मागणी करण्यात आली. रब्बी हंगामात पेरलेला मका, भुईभूग आदी पीके घेतलेल्या शेतकऱ्यांची पेरणीसाठी शेती तयार करणे अजूनही बाकी आहे. सलग आठवडाभर चाललेल्या पावसामुळे शेतकरी संभ्रमावस्थेत आहे.

जिल्ह्यात सध्या शेतकऱ्यांना खरिप हंगामाच्या तयारीला वेग दिल्याचे दिसून येत आहे. शेतकऱ्यांकडून जमिनीची मशागत पूर्ण होत आली असून त्यांनी आता बि-बियाणे, खते यांच्या नियोजनाला सुरूवात केली आहे. जिल्ह्यात खरीपासाठी ३ लाख ५० हजार मे.टन खतांच्या आवंटन उपलब्ध करण्यात आले आहे. जि.प.च्या कृषी वभागाकडून शासनाकडे मागणी नोंदविण्यात आली होती. त्याप्रमाणे खते उपलब्ध झाली आहेत.
जिल्ह्यात दरवर्षी सरासरी ७ लाख ३९ हजार हेक्टर क्षेत्रावर खरिपाची पेरणी होत असते. मागील वर्षी हीच पेरणी ७ लाख ३६ हजार हेक्टवर करण्यात आली होती. गेल्या वर्षी जिल्ह्यात ५ लाख ५ हजार ७९० हेक्टवर कापसाची लागवड झाली होती. सध्यास्थितीत जिल्ह्यात १ लाख ४४ हजार ३८६ मे.टन खत साठा शिल्लक आहे.
कृषी विभागाकडून तक्रार निवारण केंद्रांची स्थापना जिल्ह्यात खरिप हंगामात शेतकरी पेरणीच्या वेळी खते देतात. मात्र याचवेळी युरियासह इतर खतांचा तुटवडा होतो. बहुतांश वेळा खते कृषी विक्रेत्यांकडे उपलब्ध असतानाही शेतकऱ्यांना मिळत नाही. त्यासाठी कृषी विभागाने तक्रार निवारण केंद्र सुरू केले आहे. तसेच जादा दराने बियाणे विक्री करीत असल्यास शेतकरी त्यावर अपाली तक्रार नोंदवू शकणार आहे.
खतांच्या मागणीत वाढ
जिल्ह्यात खरिप हंगामात रासायनिक खतांना मोठी मागणी असते. त्यात युरियाला जिल्ह्यात पेरणीच्या वेळेला खतांची शेतकऱ्यांकडून सर्वाधिक मागणी आहे. त्याअनुषंगाने जिल्ह्यात युरिया खताची १ लाख २० हजार मे.टन तर एस.एस.पी ५ हजार ५०० मे.टन, एन.पी. के. १ लाख २० हजार तर फॉस्फेट २० हजार, पोटॅश ३० हजार मे. टन खतांच्या आवंटनाची मागणी कृषी विभागाने शासनाकडे उपलब्ध करण्याची मागणी केली आहे.
जिल्ह्यासाठी कापसाची २५ लाख पाकीटे
जिल्ह्यात मे व जून महिन्यात कापसाची लागवड केली जाते. यंदा जिल्ह्यासाठी २५ लाख २५ हजार कापसाच्या बियाण्याचे पाकीटे जिल्ह्याला उपलब्ध झाली आहेत. कृषी विभागाकडून शासनाकडे बियाण्याच्या मागणीचा पुरवठा नोंदविण्यात आला होता. मागील वर्षी जिल्ह्यात ५ लाख ५ हजार ७९० हेक्टरवर कपाशीची लागवड झाली होती. ४९ हजार १७६ क्विंटल बियाण्याची विक्री झाली होती. त्यात कापसाच्या १० हजार २५६ क्विंटल बियाण्याची विक्री झाली होती. यंदाही जिल्ह्यात मान्सूमपूर्व कपाशीची लागवड बहुतांश बागायत शेतकऱ्यांनी केली आहे.
कृषी केंद्रांवर कारवाई
खरिप हंगामाच्या अनुषंगाने कृषी विभागाने अनियमिततेसह नियमांचे उल्लंघन करणाऱ्या जळगाव जिल्ह्यातील सात कृषी केंद्रांचे परवाने निलंबित केले आहेत. जिल्हा परिषदेच्या कृषी विभागातर्फे गैरप्रकाराला आळा घालण्यासाठी भरारी पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे.