---Advertisement---

कत्तलीसाठी आणलेल्या गुरांची सुटका, यावल पोलिसांनी केली एकास अटक

---Advertisement---

जळगाव : जिल्ह्यात गुरांची अवैधरित्या वाहतुकीच्या घटना सतत होत असल्याचे दिसून येत आहे. यातच यावल तालुक्यातून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. सकाळी गावांतून कत्तलीसाठी बांधून ठेवलेल्या गुरांची सुटका करण्यात आली असून याप्रकरणी एकास अटक करण्यात आली आहे. दरम्यान, यावल पोलीस स्थानकांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कत्तलीसाठी गुरे नेण्यात येणार असल्याची गोपनीय माहिती यावल पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षकांना मिळाली होती. यावल तालुक्यातील साकळी गावातील उर्दू शाळेजवळ एका शेडमध्ये पाच गुरांना कत्तलीच्या उद्देशाने बांधून ठेवण्यात आले होते. या माहितीची तात्काळ दखल घेत, पोलीस निरीक्षकांनी तात्काळ कारवाई करण्याचे निर्देश पथकाला दिले.

---Advertisement---

यानुसार, रविवार (२९ जून) रोजी पहाटे ६ वाजेच्या सुमारास पोलिसांनी त्या शेडवर छापा टाकला. यावेळी पोलिस पथकाने शाहबाज खान लियाकत खान कुरेशी (वय २७, रा. साकळी, ता. यावल) या संशयित आरोपीला अटक केली. त्याच्या ताब्यातून कत्तलीसाठी बांधून ठेवण्यात आलेल्या पाच गुरांची सुटका करण्यात आली.

याप्रकरणी यावल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस कॉन्स्टेबल अनिल साळुंखे यांनी या कारवाईत सहभाग घेतला, तर या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल गणेश रोहिल हे करत आहेत.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---