जळगाव : शहरात स्वातंत्र्यवीर सावरकर यांची जयंती मोठ्या उत्सहात साजरी करण्यात आली. याअंतर्गत साई इच्छा फाउंडेशनच्या वतीने स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांची जयंतीनिमित्ताने विशेष उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. हा उपक्रम समाजसेविका दिपाली कासार यांच्या पुढाकाराने घेण्यात आला. त्यांनी गरजूंना मदतीचा हात देत सावरकरांच्या विचारांचा प्रसार केला.
या उपक्रमात बेघर, गरीब, कचरा उचलणारे सफाई कर्मचारी यांच्यासोबत स्नेहसंमेलन घेण्यात आले. त्यांना अन्नवाटप, कपडे व आवश्यक साहित्याचे वितरण करण्यात आले. दिपाली कासार यांनी कार्यक्रमात सावरकरांच्या विचारांची माहिती देताना सांगितले, “सावरकरांचे राष्ट्रप्रेम, समाजसुधारणा व स्वाभिमानाचे तत्त्व आजही प्रेरणादायक आहेत. समाजातील शेवटच्या घटकापर्यंत मदत पोहोचवणे हाच त्यांच्या जयंतीचा खरा अर्थ आहे.”

कार्यक्रमात स्वयंसेवकांनी सावरकरांच्या जीवनकार्यावर आधारित माहिती, प्रेरणादायक गोष्टी सांगितल्या. साई इच्छा फाउंडेशन आणि दिपाली कासार यांचे कार्य समाजात सकारात्मक परिवर्तन घडवण्याच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल ठरत आहे.