जळगाव : गद्दारांना मी पाडेल म्हणणारे संजय राऊत स्वतः जळगावात उमेदवार शोधू शकले नाहीत, जे मिळाले त्यांचीही बोवनी झाली नाही असा उपरोधिक टोला पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी लागवीला. ते प्रसामाध्यमांच्या प्रतिनिधींसोबत बोलत होते. आता आगामी महापालिकेच्या निवडणुकीत काय करणार ? असा सवाल उपस्थित करीत ना. गुलाबराव पाटील म्हणाले, जसे आले तसे काळं तोंड करून परत जातील, अशी टीकाही त्यांनी केली.
चोपडा तालुक्यातील रस्त्यावर महिलेची प्रसूती झाल्याच्या घटनेवरून ठाकरे गटाचे नेते खा.. संजय राऊत यांनी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्यावर टीका केली आहे होती. या टीकेला उत्तर देतांना पालकमंत्री पाटील यांनी दुर्दैवी घटना मान्य आहे, पण याचा अर्थ सगळीकडे यंत्रणा अपयशी आहे असं नाही, असे स्पष्ट करीत त्यांनी संजय राऊतांच्या वक्तव्याचा खरपूस समाचार घेतला.

आगामी निवडणुकांबाबत बोलतांना ना. पाटील म्हणाले की, येणाऱ्या निवडणुकांमध्ये महायुती म्हणून एकत्र लढण्याचा शिवसेनेचा विचार आहे. निवडणुका जसजशा जवळ येतील, तसतसा निर्णय घेतला जाईल. यावेळी त्यांनी महाविकास आघाडीवर निशाणा साधला.
राऊतांचे आरोप फेटाळले
संजय राऊतांच्या विधानसभा निवडणुकीतील आरोपांवर प्रतिक्रिया देताना पाटील म्हणाले, ईव्हीएम, ईडी, सीबीआयचा वापर झाला, हे आरोप केवळ पाट्या टाकण्यासाठी. निवडणूक निकाल हे जनतेच्या निर्णयाचे प्रतिक आहे. मफलर घेऊन आलेले राऊत आता कुठे गेले ? संजय राऊत पांढरा पायाचे जेथे जातात तिथे शिवसेना संपते असा आरोप करीत ना. पाटील यांनी खा. संजय राऊत यांनी जळगावला ही त्या स्थतीत आणले असल्याचे सांगितले.
सुरेश दादा जैन भेटीवर स्पष्टीकरण
सुरेश दादा जैन यांनी राजकारणातून काही प्रमाणात स्वतःला वेगळं ठेवलं आहे. ते चांगल्याच्या पाठीशी असतात. राऊत कितीही प्रयत्न करा, त्याचा उपयोग होणार नाही. दादा आमचेही ज्येष्ठ नेते आहेत, असं त्यांनी ठणकावून सांगितलं.
मराठी ही आमच्या अस्मितेचा भाग आहे, आणि हिंदी राष्ट्रभाषा आहे. प्रताप सरनाईक यांनी तो विचार त्यांच्या दृष्टीने मांडला असेल, असं मतही त्यांनी मांडलं.