---Advertisement---

विहिरीत पाय घसरुन पडल्याने १५ वर्षीय मुलीचा दुर्दैवी अंत

by team

---Advertisement---

अमळनेर : तालुक्यातील नागाव शिवारातील शेतात एका १५ वर्षीय मुलीचा विहिरीत तोल जाऊन पडल्याने करुण अंत झाल्याची घटना मंगळवारी (२७ मे) रोजी घडली. ही घटना दुपारी अडीच वाजेच्या घडली आहे. याप्रकरणी अमळनेर पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. देवयानी संदीप पाटील (वय १५ रा. धुपी ता. अमळनेर) असे मयत मुलीचे नाव आहे.

अमळनेर तालुक्यातील धुपी गावात देवयानी पाटील ही मुलगी परिवारासह वास्तव्याला आहे. मंगळवारी (२७ मे) रोजी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास नगाव शिवारातील शेत गट क्रमांक ७/१ मध्ये भाग्यश्री पिंगळे यांचे शेत आहे. त्यांच्या शेतातील विहिरीत देवयानी पाटील ही तोल जावून पडली. दुर्दैवाने तिचा पाण्यात बुडून मृत्यू झाला.

या घटनेची माहिती मिळाल्यानंतर अमळनेर पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी यांनी घटनास्थळी धाव घेवून स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने देवयानीचा मृतदेह विहिरीतून बाहेर काढला. त्यानंतर, अमळनेर ग्रामीण रूग्णालयात हलविण्यात आला. याप्रकरणी देवयानीचे काका रावसाहेब लोटन पाटील यांनी दिलेल्या खबरीवरून अमळनेर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. या घटनेमुळे धुपी गावात शोककळा पसरली. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक भगवान शिरसाठ हे करीत आहे.

---Advertisement---

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment