जळगाव: खासदार संजय राऊत दररोज माध्यमांतून मांडतात. शिवसेना सोडून गेलेल्यांना ते गद्दार म्हणतात, मात्र संजय राऊत हेच सर्वात आधी फुटणार होते. शिवसेना हायजॅक करायचा प्रस्ताव संजय राऊतांनीच अगोदर मांडला होता, असा खळबळजनक गौप्यस्फोट पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केला आहे.
पाळधी येथे आयोजित एका कार्यक्रमानंतर पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी माध्यमांशी संवाद साधला. शिंदे गटाचे नेते शहाजी बापू पाटील यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या बंडाच्या वेळी संजय राऊत यांनाही सोबत गुवाहटीला यायचे होते असा दावा केला होता. तसेच मात्र, सोबतच्या आमदारांनी संजय राऊतांना कडाडून विरोध केला. त्यामुळे राऊत यांना सोबत घेतलं नाही आणि हीच त्यांची मोठी पोटदुखी आहे असेही त्यांनी सांगितले होते. आता हीच रि पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनीही ओढली आहे. पालकमंत्री गुलाबराव पाटील म्हणाले की, शिवसेना पक्षात फूट पडल्यानंतर सर्वात आधी संजय राऊत फुटणार होते. शिवसेना हायजॅक करण्याचा प्रस्ताव संजय राऊत यांनीच एकनाथ शिंदे यांच्याकडे मांडला होता, असा खळबळजनक गौप्यस्फोट मंत्री गुलाबराव पाटील यांनी केला आहे. गुवाहटीतील काय झाडी, काय डोंगार, काय हाटील फेम शिवसेना नेते शहाजी बापू पाटील यांच्या वक्तव्याच्या संदर्भाने विचारलेल्या प्रश्नावरुन आता गुलाबराव पाटील यांनीही खळबळजनक वक्तव्य केले आहे.
संजय राऊतच सर्वात पहिले फुटणार होते, असे गुलाबराव पाटील यांनी म्हटले आहे. दरम्यान, संजय राऊतांकडून शिवसेना शिंदे गटाच्या नेत्यांवर दररोज शाब्दिक हल्ले चढवले जातात. पक्षफुटीवरुन जोरदार टीका केली जाते. मात्र, आता शहाजी बापू पाटील यांच्यानंतर मंत्री गुलाबराव पाटील यांनी देखील संजय राऊतांबद्दल खळबळजनक दावा केला आहे.