---Advertisement---
व्याक्तीच्या जन्मापासून ते मृत्यूपर्यंत विविध संस्कार पार पडतात. त्यापैकी विवाह संस्कार हा व्यक्तीच्या जीवनातील महत्वाचा टप्पा असतो.मात्र सध्याची सामाजिक स्थिती लक्षात घेता विवाह जुळविणे हे मोठे आव्हान निर्माण झाले आहे. अशातच अनेक शहरांबद्दल किंवा गावांबद्दल ऐकले असेल जिथे महिलांच्या कमतरतेमुळे पुरुष अविवाहित राहतात. काही वर्षांपूर्वी, राजस्थान आणि हरियाणा मधील काही ठिकाणी असे दिसून आले होते, जिथे वाढत्या स्त्रीभ्रूणहत्येमुळे मुलांना लग्नासाठी मुली मिळणं कठीण होतं. असंच एक गाव आहे जे शेकडो अविवाहित मुलींनी भरलेले आहे.
जिथे मुलींनाही लग्नासाठी मुलं मिळत नाहीत आणि याचे कारणही खूप विचित्र आहे. हे एक ब्राझीलमधील नोइवा दो कोरेडेरो नावाचा गाव आहे. येथे अशा सुमारे ६०० मुली आहेत, ज्यांचे वय २० ते ३५ वर्षांच्या दरम्यान आहे आणि या मुलींना लग्नासाठी मुले मिळत नाहीत. याचे एक कारण म्हणजे या गावात अविवाहित पुरुष शोधणे खूप कठीण आहे.
खरं तर, या गावातील सर्व पुरुष एकतर विवाहित आहेत किंवा या अविवाहित मुलींचे नातेवाईक आहेत, ज्यामुळे ते लग्न करू शकत नाहीत. मुलींचे लग्न न होण्याचं दुसरे कारण जे तुम्हाला आश्चर्यचकित करेल. साधारणपणे लग्नानंतर वधु ही वराच्या घरी राहायला जातात असा नियम आहे. परंतु ब्राझीलमधील नोइवा दो कोरेडेरो या गावातील मुली लग्नानंतरही या गावातच राहू इच्छितात.
बहुतेक मुली म्हणतात की लग्नानंतर मुलाने त्यांच्यासोबत त्यांच्याच गावात येऊन राहावे आणि त्यांचे नियम आणि कायदे पाळावेत अशी त्यांची इच्छा आहे. आणि यामागच कारण म्हणजे १९९५ मध्ये महिलांनी बनवलेला एक नियम. या नियमात, येथील महिला पुरुषांनी बनवलेले नियम पाळत नाहीत. महिलांना वाटते की त्या त्यांचे आयुष्य त्यांच्याच अटींवर जगतील, हे देखील लग्न न होण्याचे एक कारण आहे.