काळजाचा थरकाप! १३ महिलांवर वाघाचा भीषण हल्ला,तर ४ महिला जागीच ठार ; परिसरात भीती आणि संतापाचे वातावरण

---Advertisement---

 

चंद्रपूर जिल्ह्यातून एक अत्यंत हृदयद्रावक आणि धक्कादायक घटना समोर आली आहे. जिल्ह्यातील सिंदेवाही तालुक्यातील गुंजेवाही परिसरात जंगलात तेंदूपत्ता गोळा करण्यासाठी गेलेल्या १३ महिलांच्या टोळीवर वाघाने अचानक भीषण हल्ला चढवला. या दुर्दैवी आणि थरारक हल्ल्यात ४ महिलांना आपला जीव गमवावा लागला आहे, तर इतर महिलांनी कसाबसा पळ काढल्याने त्या थोडक्यात बचावल्या आहेत. या भीषण घटनेमुळे संपूर्ण चंद्रपूर जिल्ह्यात खळबळ उडाली असून गावकऱ्यांमध्ये प्रचंड भीती आणि संतापाचे वातावरण पसरले आहे.
​मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, उन्हाळ्याच्या हंगामात रोजगारासाठी ग्रामीण भागातील नागरिक जंगलात तेंदूपत्ता तोडण्यासाठी जातात. सुरक्षेचा उपाय म्हणून गुंजेवाही परिसरातील १३ महिला एकत्र घोळका करून जंगलात गेल्या होत्या. मात्र, दबा धरून बसलेल्या वाघाने अचानक या महिलांवर अत्यंत आक्रमकपणे झडप घातली. वाघाचा हल्ला होताच घाबरलेल्या महिला जिवाच्या आकांताने ओरडत सैरावैरा पळू लागल्या.
​जंगलात तातडीने कोणतीही मदत मिळणे कठीण असल्याने, वाघाने महिलांना बचावाची कोणतीही संधी न देता सलग हल्ले केले आणि ४ महिलांना जागीच ठार केले.


​मृत महिलांची नावे
​१. कवडूबाई दादाजी मोहुर्ले
२. अनूबाई दादाजी मोहुर्ले
३. सुनिता कौशिक मोहुर्ले
४. संगीता संतोष चौधरी
​या हृदयद्रावक घटनेची माहिती मिळताच वनविभागाला पाचारण करण्यात आले आहे. वनविभागाचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी तातडीने घटनास्थळ गाठून वाघाचा शोध आणि तपास सुरू केला आहे. या घटनेनंतर संपूर्ण परिसरात दहशतीचे सावट पसरले असून, वन्यजीवांच्या वाढत्या हल्ल्यांमुळे स्थानिक नागरिकांमधून प्रशासनाविरोधात तीव्र संताप व्यक्त होत आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---