---Advertisement---

मोठी बातमी! जळगाव जिल्ह्यातील हजारो शेतकरी ‘या’ योजनेतून बाद होण्याची शक्यता, काय आहे कारण?

---Advertisement---

जळगाव : जळगाव जिल्ह्यातील तब्बल ६ हजार ७७९ शेतकरी पीकविमा योजनेतून बाद होण्याची शक्यता आहे. पीकविमा काढलेल्या शेतकऱ्यांनी शेतात केळी लागवड केली आहे की नाही ? याची पडताळणी कृषी विभाग व पीकविमा कंपनीकडून करण्यात आली आहे. मात्र, जिल्ह्यातील तब्बल ६ हजार ७७९ शेतकऱ्यांनी पडताळणीदरम्यान सहकार्य केले नसल्याचे समोर आले आहे.

जळगाव जिल्ह्यात आतापर्यंत ५७ हजार शेतकऱ्यांची पडताळणी पूर्ण झाली आहे. मात्र, जिल्ह्यातील तब्बल ६ हजार ७७९ शेतकऱ्यांनी पीकविमा क्षेत्राची पडताळणीसाठी सहकार्य केलेले नाही, या शेतकऱ्यांचे अर्ज बाद ठरविले जाण्याची शक्यता आहे

कृषी विभागाने आता विमा कंपनीला ५ एप्रिलपर्यंतचा अल्टिमेटम दिला असून, १०० टक्के पडताळणी करून, आपला अंतिम अहवाल सादर करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

---Advertisement---

दरम्यान, पीकविमा कंपनीला ३१ मार्चपर्यंत संपूर्ण क्षेत्राची पडताळणी करून, आपला अहवाल सादर करण्याच्या सूचना कृषी विभागाकडून देण्यात आल्या होत्या. मात्र, ३१ मार्चपर्यंत ५७ हजार ९५३ शेतकऱ्यांच्या शेतातील केळीची पडताळणी झाली आहे.

७ हजारहून अधिक शेतकऱ्यांची पडताळणी बाकी

तर अजून ७ हजारहून अधिक शेतकऱ्यांची पडताळणी बाकी आहे. पीकविमा कंपनीकडून अहवाल प्राप्त झाल्यानंतर जिओ टॅगिंगच्या अहवालानंतर बोगस विमाधारकांबाबत कृषी विभाग अंतिम निर्णय घेणार आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---