एरंडोल : किरकोळ कारणावरुन एका ३४ वर्षीय तरुणाला पाच जणांनी मारहाण केली होती. या मारहाणीत जखमी झालेल्या तरुलणावर जळगाव येथे उपचार सुरु असतांना त्याचा बुधवारी मृत्यू ओढवला. पोलिसांनी मारहाण प्रकरणात पाच जणांना संशयावरुन अटक केली आहे. त्यांना न्यायालयात उभे केले असता तिघांना एक दिवस पोलीस कोठडी तसेच संशयित महिलेस न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.
याबाबत हकीकत अशी,की एरंडोल :- घरासमोरील मोकळ्या जागेत वाहन लावण्याच्या किरकोळ कारणावरून पाच जणांनी केलेल्या मारहाणीत ३४ वर्षीय युवकाचा जळगाव येथे आज सकाळी औषधोपचार सुरु असतांना मृत्यू झाला.पोलिसांनी मारहाण करणा-या पाचही संशयितांना अटक केली असून त्यातील तीन जणांना एक दिवस पोलीस कोठडीत तर
संशयित महिलेस न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचा आदेश न्यायालयाने दिला.मारहाणीत मरण पावलेल्या युवकावर सायंकाळी शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले

याबाबत माहिती अशी,की कैलास रतन पाटील व तुकाराम उर्फ आप्पा सीताराम पाटील हे शहरातील गाढवे गल्लीत राहतात. त्यांच्यात घरासमोर असलेल्या मोकळ्या जागेत वाहन लावण्यावरून रविवारी (ता.२५) वाद झाला होता. कैलास पाटील यांचा मोठा मुलगा अमोल पाटील (वय-३४) हा वीज वितरण कंपनीत ऑपरेटर म्हणून एक वर्षांपूर्वी नौकरीस लागला होता. रविवारी सकाळी अमोल हा ड्युटीवरून घरी आल्यानंतर त्याने मोटर सायकल (क्रमांक एमएच १९ बीएल ५११४) घरासमोरील मोकळ्या जागेवर लावली होती. यावेळी तुकाराम पाटील यांनी अमोल यास मोटार सायकल लावण्यास विरोध करत शिवीगाळ केली. त्याचवेळी तुकाराम पाटील यांची मुले रोहित उर्फ बंटी पाटील व आशिष पाटील व दीपक नामदेव पाटील यांनी अमोल पाटील यास लाकडी दांडक्याने तर तुकाराम पाटील यांनी लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. अमोलला मारहाण करीत असतांना त्याचे भाऊ सचिन पाटील,जयेश पाटील,चुलत भाऊ संजय पाटील यांनी अमोलला वाचवण्याचा प्रयत्न केला असता त्यांना देखील मारहाण करण्यात आली.आशिष पाटील याने अमोल पाटील याचे पाय धरून त्यास घरासमोर असलेल्या सिमेंट कॉंक्रीटच्या रस्त्यावर जोरात आपटल्यामुळे त्याचे त्याच्या मेंदूस गंभीर दुखापत होऊन डोक्यातून रक्त वाहू लागले.संशयित रोहित पाटील याने अमोलच्या वाहिनीस देखील मारहाण केली.तर उषाबाई पाटील यांनी अमोल पाटील यांच्या परिवारातील सदस्यांवर दगडफेक केली.अमोल पाटील हा गंभीर जखमी झाल्याने त्यास ग्रामीण रुग्णालयात नेले असता त्यास डोक्यास गंभीर जखम झालेली असल्यामुळे जळगाव येथे रवाना केले.जळगाव येथे उपचार सुरु असतांना त्याचे सकाळी निधन झाले.