---Advertisement---

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या विमानाला विलंब, किडनी रुग्णाचे वाचले प्राण

---Advertisement---

जळगाव : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे शुक्रवारी (६ जुन ) जळगाव जिल्हा दौऱ्यावर होते. आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर संत मुक्ताईंच्या पालखीच्या प्रस्थान सोहळ्यात सहभागी होण्यासाठी ते मुक्ताईनगर येथे आले होते. मात्र, त्यांच्या प्रवासात झालेल्या विलंबामुळे एक महिला रुग्णाचे प्राण वाचल्याची हृदयस्पर्शी घटना समोर आली आहे.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे जळगाव विमानतळावर आगमन दुपारी ३.४५ वाजता अपेक्षित होते, परंतु ते तब्बल अडीच तास उशिरा, सायंकाळी ६.१५ वाजता पोहोचले. त्यानंतर मुक्ताईनगर गाठून त्यांनी पालखी सोहळ्यात सहभाग घेतला व संत मुक्ताईंचे दर्शन घेतले. परतीच्या प्रवासातही विलंब झाला आणि रात्री ९.१५ वाजता ते पुन्हा जळगाव विमानतळावर परतले.

या वेळी विमानाच्या उड्डाणास वैमानिकांनी उशीराचा हवामान आणि वेळेच्या मर्यादेचा हवाला देत तात्पुरता नकार दिला. परिणामी, मंत्री गिरीश महाजन, मंत्री गुलाबराव पाटील तसेच जिल्हाधिकारी व प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी वैमानिकांना समजावण्याचा प्रयत्न केला. अखेर ४५ मिनिटांच्या चर्चेनंतर वैमानिकांनी उड्डाणाला परवानगी दिली.

या विलंबामुळे एक अत्यंत गरजूंना मदतीचा हात मिळाला. शितल पाटील या किडनीच्या गंभीर आजाराने ग्रस्त महिला रुग्णाला तातडीने मुंबईतील रुग्णालयात पोहोचणे आवश्यक होते. मात्र नियोजित विमान तिच्या आधीच निघून गेले होते. ही माहिती गिरीश महाजन यांना मिळताच, त्यांनी शिंदे यांच्या विमानातून रुग्ण व तिच्या पतीला मुंबईला रवाना करण्याची विनंती केली, जी तातडीने स्वीकारण्यात आली. मुंबई विमानतळावर पोहोचताच रुग्णासाठी विशेष रुग्णवाहिकेची व्यवस्था देखील करण्यात आली होती, अशी माहिती गिरीश महाजन यांनी दिली. शिंदे यांच्या उशिरामुळे निर्माण झालेली अडचण एका किडनी रुग्णासाठी जीवनदायी ठरली. प्रशासन व नेत्यांनी दाखवलेल्या तत्परतेचे अनेक स्तरातून कौतुक होत आहे.

मंत्री गिरीश महाजन यांनी या घटनेबाबत सांगितले की, जळगाव येथील एका किडनीच्या आजाराने ग्रस्त महिलेवर किडनी प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया मुंबई येथे होणार होती. यासंदर्भात त्यांना सायंकाळी ५ वाजता फोन आला की शस्त्रक्रियेसाठी रात्री १० वाजेपर्यंत पोहचण्याबाबत कळविण्यात आले. एवढ्या कमी वेळात हे शक्य नव्हते, या संदर्भांत मी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सोबत असताना फोन आला. त्या महिलेची अडचण मी ना. शिंदे यांना सांगितली असता त्यांनी लागलीच होकार दिला. महिला रुग्ण शीलत पाटील व त्यांचे पती हे उपमुख्यमंत्र्यांसोबत त्यांच्या विमानात गेले.

ना. गुलाबराव पाटील यांनी सांगितले, मंत्री गिरीश महाजन यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना किडनीच्या आजाराने त्रस्त दोन रुग्णांना मुंबई येथे शस्त्रक्रियेला घेऊन जाणे आवश्यक असल्याचे सांगितले. जर त्यांना वेळेवर मुंबईला नेले नाही तर त्यांच्या जीवाचे बरे वाईट होऊ शकते, याची कल्पना दिली. यावर उपमुख्यमंत्री शिंदे यांनी तत्काळ होकार देत रुग्णांना सोबत नेले. त्यांच्या या कृतीतून ते आजही त्यांची सामान्य माणसांसोबत नाळ जुडली असल्याचे दिसून येत आहे.

---Advertisement---

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment