---Advertisement---

Mole: शरीराच्या ‘या’ ठिकाणावर तीळ असलेल्या महिला असतात भाग्यवान, ठरतात पुरुषांमध्ये आकर्षणाचे केंद्र

by team

---Advertisement---

Mole: जवळपास प्रत्येक माणसाच्या शरीराच्या अवयवांवर तीळ असतात. महिलांच्या शरीरावर असणाऱ्या तिळांचे वेगवेगळे महत्त्व असते. विज्ञान त्यांना वाईट पेशी म्हणत असले तरी, सामुद्रिक शास्त्र या तीळांना लोकांच्या नशिबाशी जोडते. काही तीळ हे शुभ ठिकाणी असतात तर काही ठिकाणी असणारे तीळ हे तुम्हाला अशुभ ठरतात आणि त्याचा दुष्परिणाम तुम्हाला भोगावा लागतो असे हे शास्त्र सांगते.

सामुद्रिक शास्त्रात असे म्हटले आहे की तीळ व्यक्तीच्या व्यक्तिमत्त्वाचे रहस्य देखील प्रकट करतात. यासोबतच त्यांच्या नशिबातील शुभ आणि अशुभ गोष्टीही सांगता. पण शरीरावर नक्की अशा कोणत्या ठिकाणी असणारे तीळ महिलांना अशुभ ठरतात आणि त्याचा कोणता परिणाम त्यांना भोगावा लागतो याची माहिती खालील लेखात दिलेली आहे.

मानेवर तीळ

मानेवर तीळ असणे हे स्त्रीच्या संयम आणि बुद्धिमत्तेचे प्रतीक आहे. या महिला खूप बुद्धिमान असतात आणि त्यांची स्वप्ने पूर्ण करण्यासाठी कठोर परिश्रम करतात. तसेच, त्या त्यांच्या कुटुंबासाठी खूप भाग्यवान असतात.

ओठांवर तीळ

जर एखाद्या महिलेच्या ओठांवर तीळ असेल तर ती केवळ दिसण्यातच सुंदर नसते तर खूप भाग्यवान देखील असते. ज्या महिलांच्या ओठांवर तीळ असतो त्या पुरुषांमध्ये आकर्षणाचे केंद्र असतात. त्यांना कधीही पैशाची कमतरता भासत नाही. या महिला फक्त श्रीमंत पुरुषांशीच लग्न करतात.

पोटावरील तीळ

सामुद्रिक शास्त्रानुसार, एखाद्या महिलेच्या पोटावरील बेंबीच्या जवळ असेल तर तिला सतत कोणत्या ना कोणत्या शारीरिक आजाराला सामोरे जावे लागते. शारीरिक आजारामुळे ही महिला कायम अस्वस्थ राहते.

कपाळावर तीळ

सामुद्रिक शास्त्रानुसार, ज्या महिलांच्या कपाळावर तीळ असतात त्यांना यशाचा मार्ग स्वतः तयार होतो. या महिलांना आयुष्यात कधीही पराभवाचा सामना करावा लागत नाही. या महिला स्वतःच त्यांचे ध्येय साध्य करतात.

पापणीवर तीळ

सामुद्रिक शास्त्रानुसार, जर कोणत्याही महिलेच्या डोळ्याच्या बुबुळावर किंवा पापणीवर तीळ असेल तर या महिलांवर त्यांच्या आजूबाजूचे लोक आंधळेपणाने विश्वास ठेवतात आणि त्यांना कधीही पैशाची कमतरता भासत नाही. त्यांचे लग्न नेहमीच श्रीमंत कुटुंबात होते.

खांद्यावर तीळ

सामुद्रिक शास्त्रात खांद्यावर तीळ असणे हे महिलेच्या संपत्तीची विपुलता दर्शवते. या महिला त्यांच्या आयुष्यात सर्व प्रकारच्या सुखसोयी प्राप्त करतात. त्या त्यांच्या बोलण्यात गोड आणि संयमी असतात.

टीप : वरील माहिती ही केवळ धार्मिक श्रद्धा आणि लोकश्रद्धेवर आधारित आहे. यासाठी कोणताही वैज्ञानिक पुरावा नाही. तरुण भारत लाईव्ह,कोणत्याही गोष्टीच्या सत्यतेचा पुरावा देत नाही.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---