---Advertisement---
जळगाव : येथील तरुणाचा रावेरकडून भुसावळकडे येणाऱ्या रस्त्यावर दुचाकीने जात असतांना बामणोद ते पाडळसा रस्त्यावर अपघाती निधन झाले आहे तर दोघे गंभीर जखमी झाले आहेत. हा अपघात रविवारी भरधाव एसटी बस व दुचाकी यांच्यांत सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास घडला. फैजपूर पोलीस स्टेशनला घटनेची नोंद घेण्याचं काम सुरू होते. मयूर अण्णा गवळी (वय ३०) असे मयत तरुणाचे नाव आहे.
---Advertisement---
जळगाव शहरातील छत्रपती शिवाजी महाराज उड्डाण पुलाजवळ गुळाची महाबासुंदी चहा नावाचे मयूर गवळी याचे दुकान आहे. मयूर हा मित्र जयेश पाटील आणि गोयर नामक असे तिघे रविवारी दुपारी दुचाकीने बामणोद येथे गेले होते. काम आटोपून तिघे दुचाकीने घरी परतत असताना वळणावर एसटी बससोबत त्यांची धडक झाली. अपघात इतका भीषण होता की, मयूर गवळी याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला.
अपघातात दोघे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर जळगावातील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अपघातानंतर सर्व जखमींना भुसावळ येथील ट्रामा सेंटर येथे दाखल करण्यात आले होते. मयूर अण्णा गवळी हा मनमिळाऊ स्वभाव आणि नेहमी सर्वांना सहकार्य करीत असल्याने मयुरच्या अपघाताची माहिती मिळताच अनेकांनी घटनास्थळी धाव घेतली होती. वैजापूर पोलीस स्टेशनला घटनेची नोंद घेण्याचे काम सुरू होते. त्याच्या पश्चात आई, पत्नी, मुलगी, तीन बहिणी असा परिवार आहे.