अजितदादांच्या शेवटच्या बैठकीत काय ठरलं? विधानसभेत फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं

---Advertisement---

 

मुंबई : अजित पवार यांच्या विमान अपघातातील निधनानंतर राज्यभर शोककळा पसरली आहे. त्यांच्या निधनाच्या आदल्या दिवशी झालेल्या बैठकीबाबत देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत भावनिक आठवणींना उजाळा दिला

राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाची सुरुवात होत असताना यंदाचा अर्थसंकल्प अजित पवार सादर करणार होते. त्यासाठी ते गेल्या काही दिवसांपासून तयारीत व्यस्त होते. अपघाताच्या आदल्या दिवशी दोघांमध्ये झालेल्या बैठकीत अर्थसंकल्पातील महत्त्वाच्या तरतुदींवर सविस्तर चर्चा झाली होती. निर्णय घेताना अजितदादा ठाम भूमिका घेत असत आणि कोणतेही दुमत ठेवत नसत, असे फडणवीसांनी सांगितले.

28 जानेवारी 2026 रोजी झालेल्या विमान अपघातात त्यांच्या निधनाने राज्याने एक शिस्तप्रिय आणि कार्यतत्पर नेता गमावला, अशी भावना त्यांनी व्यक्त केली. शोक प्रस्ताव मांडताना “काही दुःखांवर वेळही मलम ठरत नाही,” असे सांगत फडणवीस भावूक झाले.

‘लाडकी  बहिणी’ योजना सुरू करताना अजित पवार यांनी गुलाबी जॅकेट परिधान करून सर्वांना तसेच जॅकेट घालण्याचा आग्रह धरला होता, अशी आठवणही त्यांनी सांगितली. सकाळी सहा वाजल्यापासून कामाला सुरुवात करणारे आणि प्रत्येक काम नियोजनबद्ध पद्धतीने पूर्ण करणारे नेते म्हणून त्यांची ओळख होती.
22 जुलै हा दोघांचाही वाढदिवस असल्याचे नमूद करत, “वयाने मोठे असल्यामुळे ते माझ्यासाठी दादा होते,” अशा शब्दांत फडणवीसांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---