आईने रागावल्याने १५ वर्षीय विद्यार्थ्याचे टोकाचे पाऊल; घरी कोणी नसताना गळफास घेऊन केली आत्महत्या….!

---Advertisement---

 

जळगाव शहरातील जोशी कॉलनी परिसरात एका १५ वर्षीय विद्यार्थ्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. प्रथम हरीश कटारे असे मृत विद्यार्थ्याचे नाव असून तो ला. ना. शाळेत इयत्ता आठवीत शिक्षण घेत होता. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, प्रथम कटारे हा अभ्यास करत नसल्याने त्याची आई त्याला रागावली होती. या कारणामुळे तो मनाने खचला आणि घरात कोणी नसल्याची संधी साधत त्याने राहत्या घराच्या छताला गळफास घेतल्याचे समोर आले आहे. ही बाब लक्षात येताच कुटुंबीयांनी तातडीने धाव घेतली; मात्र तोपर्यंत उशीर झाला होता.

या प्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाणे येथे अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे. घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे.

अशा घटना अत्यंत वेदनादायक असतात. विद्यार्थ्यांवरील ताण, अभ्यासाचा दबाव आणि भावनिक अस्थिरता याकडे पालकांनी संवेदनशीलतेने पाहणे गरजेचे आहे. कोणत्याही प्रकारचा मानसिक ताण जाणवत असल्यास त्वरित कुटुंबीय, शिक्षक किंवा समुपदेशकांची मदत घेणे आवश्यक आहे. संवाद हाच अशा प्रसंगांना रोखण्याचा सर्वात प्रभावी मार्ग ठरू शकतो.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---