जळगावात अवकाळी पावसाचा कहर; केळी बागा उध्वस्त, शेतकरी संकटात

---Advertisement---

 

जळगाव : जिल्ह्यात अवकाळी पाऊस, वादळी वारा आणि गारपिटीमुळे मोठ्या प्रमाणात केळी बागांचे नुकसान झाले असून शेतकरी संकटात सापडले आहेत. विशेषतः धरणगाव तालुक्यातील चांदसर परिसरात सर्वाधिक फटका बसला आहे.


काढणीसाठी पूर्ण तयार झालेली केळी वादळी वाऱ्यामुळे भुईसपाट झाली असून हजारो हेक्टरवरील पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. आधीच आंतरराष्ट्रीय परिस्थितीमुळे केळी निर्यातीवर परिणाम झाला असताना आता नैसर्गिक आपत्तीने शेतकऱ्यांचे आर्थिक गणित कोलमडले आहे.


दरम्यान, नुकसानग्रस्त बागांचे अद्याप पंचनामे झाले नसल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. तसेच पीक विमा कंपन्यांकडूनही कोणताही प्रतिसाद मिळत नसल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे.


नुकसानग्रस्त शेतकऱ्यांशी थेट शेतातून संवाद साधताना त्यांनी शासनाने तातडीने दखल घेऊन एकरी ५० ते ६० हजार रुपयांची मदत जाहीर करावी, अशी मागणी केली आहे. परिस्थिती गंभीर असून त्वरित मदतीची गरज असल्याचे शेतकरी सांगत आहेत.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---