---Advertisement---
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अचानक झालेल्या निधनाला संपूर्ण महाराष्ट्राला झटका बसलेला आहे. अजित पवारांच्या निधनाच्या बातमीने बारामती स्थापन महाराष्ट्रावर शोककळा पसरली आहे. त्यातच गेल्या चार दिवसांपूर्वी अजित पवार यांनी एका भाषणादरम्यान एक वाक्य बोलले होते, “ज्यात त्यांनी नियतीने बोलावल्यावर जावंच लागेल” असं विधान केलं होतं.
जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रचारार्थ आयोजित सभेत 24 जानेवारी रोजी अजित पवार हे बोलताना म्हणाले होते की, “जग कायमचं राहणार आहे. तुम्ही आम्ही आज असू, उद्या नसू. काळाच्या, नियतीच्या पुढे बोलावन आलं तर प्रत्येकाला जायचंय परंतु आपण आपल्या हयातीत काम करत असताना राजकारण हेच सर्वस्व नाही. राजकारण होत असतं. निवडणुका संपल्यावर राजकारण विसरायचं असतं पण त्यातून त्या भागात आर्थिक सुबत्ता येणार आहे हे पाहिलं पाहिजे” असं त्यांनी म्हटलं होतं.
जनतेच्या प्रेमाच्या बळावर मी कामे धडाडीने करतोय. तुम्ही सगळे माझ्या पाठीशी आहात. तुमचे प्रेम विश्वास ही माझी शक्ती आहे. हीच माझी सर्वात मोठी प्रेरणा देखील आहे. त्यामुळे मी धावपळ करत असतो. या निवडणुकीत मी इतके धावपळ केली सकाळी सांगलीत जायचं तिथे सभा घ्यायचो तिथून लातूरला यायचं तिथे सभा करायचो, लातूर वरून परभणीतून अमरावती आणि तिथून नागपूरला जाऊन रात्री मुक्कामाला पुण्याला यायचो असं. देखील अजित पवार हे सभेदरम्यान बोलले.
चार दिवसात पूर्वी झालेल्या सभेदरम्यान भाषणातून कार्यकर्त्यांना सल्ला देणारे अजित पवार आज हयात नाहीत हे कुणालाही न पटणार आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनाने महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी पोकळी निर्माण झाली असून ग्रामीण भागाशी नातं जोडलेला हा नेता आता या जगात नाही त्यामुळे कार्यकर्त्यांना अश्रू अनावर झाले आहेत. मात्र दादांसारखा लोकप्रिय नेता महाराष्ट्राने गमवला ही खंत सगळ्यांच्याच मनात कायम राहणार आहे.









