जळगावात क्रीडा मैदानांच्या समस्यांकडे लक्ष वेधण्यासाठी निवेदन

---Advertisement---

 

जळगाव शहर व जिल्ह्यातील क्रीडा सुविधांच्या अभावाबाबत लक्ष वेधण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते प्रा. डॉ. श्री. श्री. आशिष सुभाष जाधव (बडगुजर) यांनी प्रशासनाला निवेदन दिले आहे.


जिल्हाधिकारी, राज्य व केंद्र सरकार तसेच महापौर यांना दिलेल्या या निवेदनात शहरातील खेळाडूंना योग्य सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात आली आहे. विशेषतः श्रीराम स्टेडियम, शिवाजी स्टेडियम तसेच इतर मैदानांची दुरुस्ती व विकास करण्याची गरज अधोरेखित करण्यात आली आहे.


निवेदनात नमूद केल्याप्रमाणे, जिल्ह्यातील अनेक खेळाडूंना सरावासाठी आवश्यक सुविधा मिळत नाहीत. क्रिकेट, फुटबॉल, हॉकी, कुस्ती यांसारख्या खेळांसाठी मैदानांची कमतरता असून, यामुळे खेळाडूंच्या प्रगतीवर परिणाम होत आहे. तसेच, महिलां व युवकांना प्रोत्साहन देण्यासाठी क्रीडा सुविधा मोफत किंवा सवलतीत उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी करण्यात आली आहे.


याशिवाय, आहार, निवास व रोजगाराच्या समस्यांमुळे खेळाडूंना अडचणींचा सामना करावा लागत असल्याचेही निवेदनात नमूद आहे. त्यामुळे शासनाने क्रीडा क्षेत्रासाठी विशेष योजना राबवून खेळाडूंना प्रोत्साहन द्यावे, अशी मागणी करण्यात आली आहे.


सदर निवेदनावर संबंधित अधिकाऱ्यांनी सकारात्मक भूमिका घेऊन तातडीने कार्यवाही करावी, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---