---Advertisement---
आगरतळा : ज्ञान म्हणजे केवळ बोलणे नव्हे; ज्ञान म्हणजे समज. मागील दोन हजार वर्षांत संपूर्ण जगाने विज्ञानापासून ते समाजवादापर्यंत अनेक तत्त्वज्ञानांचे प्रयोग अनुभवले आहेत. परंतु, आज जगाला भारताच्या जीवनाकडे पाहण्याच्या दृष्टिकोनाची गरज आहे, याची जाणीव जगाला होत आहे. म्हणूनच आज जगाला भारताची आवश्यकता आहे. शक्तीसोबतच भक्तीही आवश्यक असते, असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांनी मंगळवारी केले.
डॉ. मोहनजी भागवत यांच्या हस्ते पश्चिम त्रिपुरा जिल्ह्यातील मोहनपूर उपविभागाच्या अंतर्गत येणाऱ्या फकीरपुरा गावात आदि शंकराचार्यांच्या शुभदिनी माँ त्रिपुरेश्वरीला समर्पित असलेल्या माँ सौंदर्य चिन्मयी मंदिराचे लोकार्पण करण्यात आले. यावेळी सरसंघचालकांनी चिन्मय विद्यालयात पूर्णपणे मोफत शिक्षण देण्याच्या उद्देशाचे मनापासून कौतुक केले.
सनातन धर्म संपूर्ण जगाला योग्य दिशा दाखवत आहे. मंदिरे ही भारतीय सामाजिक जीवनाची केंद्रे होती, असे डॉ. मोहनजी भागवत म्हणाले. आज सत्तेसोबतच भक्तीचीही आवश्यकता आहे. शिवाय सर्वांमध्ये मिसळून सर्वांची सेवा करण्याची वृत्ती बाळगणाऱ्यांनाच समाज स्मरणात ठेवतो. हीच भारताची संस्कृती आहे. दक्षिणेकडील चार राज्ये सेवाकार्यात सर्वाधिक अग्रेसर आहेत. अनेक युगांपासून आपल्यामध्ये विविधता अस्तित्वात आहे. परंतु, भारताची ही प्रगती रोखण्यासाठी बाह्य शक्ती आपल्यात फूट पाडण्याचा प्रयत्न करीत असून, त्यापासून सर्वांनी सावध राहावे, असे आवाहन त्यांनी केले.
सत्याची प्रस्थापना करण्यासाठी सामर्थ्याची गरज
आजच्या युगात आपल्यापाशी केवळ सत्य असणे पुरेसे नाही, तर त्या सत्याची प्रस्थापना करण्यासाठी सामर्थ्यार्थ्यांची आवश्यकता असते. भारताची शक्ती त्याच्या संस्कृतीमध्ये सामावलेली आहे. तथापि, भारताने कधीही आक्रमक मानसिकता बाळगलेली नाही. भारताने सातत्याने शांतता आणि बंधुभावाचा पुरस्कार केला, अशी शांतता जिची आजच्या युद्धग्रस्त जगात अत्यंत निकडीने गरज आहे. नेमक्या याच क्षेत्रात भारत आपले कार्य अविरतपणे करीत आला आहे, असे डॉ. मोहनजी भागवत म्हणाले.
भारताची उपासना पद्धत अद्वितीय
देशाच्या सामाजिक रचनेच्या भारताच्या ऋषिमुनींनी कानाकोपऱ्यात, भारताने स्वीकारलेली ईश्वर उपासनेची ती अद्वितीय पद्धत रुजवण्याचे कार्य हाती घेतले आहे. एक अशी पद्धत, जिचे वैशिष्ट्य म्हणजे नद्या, टेकड्या आणि पर्वतांचा समावेश असलेल्या निसर्गाविषयी बाळगलेली सखोल आदरभावना होय. हा प्रचंड मोठा उपक्रम एका रात्रीत साध्य झाला नाही. ते उदात्त ध्येय साध्य करण्याची ती मोहीम एक अखंड चालणारी प्रक्रिया आहे, असे डॉ. मोहनजी भागवत यांनी सांगितले.









