यंदाचे बजेट तीन कर्तव्यांवर प्रेरित: अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांची मोठी घोषणा !

---Advertisement---

 

देशाच्या इतिहासात प्रथमच अर्थसंकल्प हा रविवारी संसदेत सादर केला गेला. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी सकाळी 11 वाजता संसदेत आपले अर्थसंकल्पीय भाषण केलं. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण आज 1 फेब्रुवारी रोजी देशाचा 2026-27 चा अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पाकडे देशभरातील सर्व घटकांचे लक्ष लागल होत. निर्मला सीतारमण या नवव्यांदा देशाचा अर्थसंकल्प मांडला असून आजच्या बजेटमध्ये त्यांनी कोणत्या महत्त्वाच्या घोषणा केल्या ? हा अर्थसंकल्प, सर्वसामान्य, शेतकरी, नोकरदार, उद्योगजगत स्टार्ट्सअपसह विविध क्षेत्रांसाठी अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. यात नेमकं काय काय आहे, जाणून घ्या सविस्तर…!

यंदाचे बजेट तीन कर्तव्यांवर प्रेरित: अर्थमंत्री निर्मला सीतारमण म्हणाल्या,

“मी माघ पौर्णिमा आणि गुरु रविदास जयंतीच्या शुभ मुहूर्तावर शाचा 2026-27 चा अर्थसंकल्प सादर करत आहे. गेल्या वर्षात भारताची आर्थिक परिस्थिती चांगली होती. मी जगातील सर्वात मोठी अर्थव्यवस्था होण्याच्या उद्देशाने आजचा अर्थसंकल्प मांडत आहे. आमच्या सरकारचा संकल्प आहे की गरीब, शोषित आणि वंचितांवर लक्ष देणे आहे.

आजचा अर्थसंकल्प तीन कर्तव्यांवर प्रेरित…

१.उत्पादकता

२. लोकांची आकांशा पूर्ण करणे आणि क्षमता निर्माण करणे

३. सबका साथ सबका विकास

अर्थसंकल्पाची तीन प्राथमिक कर्तव्ये:

(१) आर्थिक विकासाला चालना द्या, गुंतवणूक, उद्योग आणि रोजगार निर्मितीला बळकटी द्या.

(२) जनतेच्या अपेक्षा पूर्ण करा, सामान्य नागरिकांसाठी अधिक सुविधा आणि संधी उपलब्ध करून द्या.

(३) सर्वांसाठी आधार, सर्वांसाठी विकास आणि विकासाचे फायदे समाजातील सर्व घटकांपर्यंत पोहोचवा.

भारत देशाचा विकास दर 7 टक्क्याने वाढला- निर्मला सीतारमण

केंद्रीय अर्थसंकल्प सादर करताना अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी सांगितलं कि, “देशाचे यशस्वी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली अनेक बदल करण्यात आले आहेत. स्वावलंबन हा आपल्या अर्थव्यवस्थेचा मुख्य मंत्र आहे. सरकारी निर्णयांद्वारे नागरिकांना फायदा व्हावा यासाठी आम्ही सर्वतोपरी प्रयत्न केले आहेत. देशाची अर्थव्यवस्था ७% विकास दराने वाढली आहे.”

अर्थसंकल्पात बायोफार्मसाठी १० हजार कोटींची तरतूद: अर्थमंत्री निर्मला सीतारमण

१.बायोफार्मसाठी १० हजार कोटींची तरतूद: अर्थमंत्री निर्मला सीतारमण

२.रचनात्मक सुधारणांवर आमचा भर असणार  

३.कॅन्सर आणि मधुमेहांवरील औषधे स्वस्त करणार

४.कृषीक्षेत्रात उत्पादकता वाढवण्यावर भर देणार 

बायोफार्मास्युटिकल्सवर आमचं लक्ष असेल… अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांची माहिती :

आमचे लक्ष बायोफार्मास्युटिकल्सवर असेल. आम्ही १० हजार कोटी रुपये वाटप करत आहोत. तीन संस्था स्थापन केल्या जातील. सध्या आमच्याकडे सात संस्था आहेत, ज्यांचा आणखी विस्तार केला जाईल. अशी त्या यावेळी म्हणाल्या…

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---