ठाकरे गटाला मोठा धक्का? बैठकीला ६ खासदार अनुपस्थित, ‘ऑपरेशन टायगर’ यशस्वी? राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण….!

---Advertisement---

 

महाराष्ट्राच्या राजकारणात चर्चेत असलेल्या कथित ‘ऑपरेशन टायगर’ संदर्भात महत्त्वाची घडामोड समोर आली आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने बोलावलेल्या संसदीय समितीच्या बैठकीला केवळ चार खासदार उपस्थित राहिल्याने पक्षातील अंतर्गत घडामोडींविषयी चर्चा रंगल्या आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, गटनेते अरविंद सावंत, राज्यसभा खासदार संजय राऊत, खासदार राजाभाऊ वाजे आणि अनिल देसाई हे बैठकीला उपस्थित होते. मात्र, इतर सहा खासदार अनुपस्थित राहिल्याने त्यांच्या पुढील राजकीय भूमिकेबाबत तर्कवितर्क सुरू झाले आहेत.

राजकीय वर्तुळात चर्चेनुसार, संजय देशमुख, नागेश आष्टीकर, ओमराजे निंबाळकर, संजय दिना पाटील, भाऊसाहेब वाकचौरे आणि संजय जाधव यांच्या नावांची पक्षांतराच्या चर्चेत चर्चा होत आहे. तथापि, संबंधित खासदारांकडून किंवा पक्षाकडून याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.

दरम्यान, ओमराजे निंबाळकर यांची भूमिका अद्याप स्पष्ट नसल्याचे सांगितले जात असून ते सध्या पुण्यात असल्याची माहिती समोर येत आहे. तसेच काही खासदार जयपूरमध्ये असल्याच्या चर्चाही राजकीय वर्तुळात रंगल्या आहेत.

बैठकीतील कमी उपस्थितीमुळे ‘ऑपरेशन टायगर’ यशस्वी झाल्याच्या चर्चांना उधाण आले असले, तरी संबंधित खासदारांची अधिकृत भूमिका आणि पक्षाची प्रतिक्रिया समोर आल्यानंतरच परिस्थिती स्पष्ट होणार आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---