सूर्य आग ओकणार! राज्यात उष्णतेच्या नव्या लाटेची शक्यता;हवामान विभागाचा अलर्ट

---Advertisement---

 

Heatwave Alert: राज्यात मान्सूनचे आगमन लवकर होणार असे संकेत मिळत असतानाच उन्हाचा तडाखा पुन्हा वाढला आहे. येत्या काही दिवसांत मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात नव्या उष्णतेच्या लाटेची शक्यता आहे.
कोकण विभाग वगळता उर्वरित राज्यात मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी उष्णतेच्या लाटेची शक्यता आहे. प्रादेशिक हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी मुंबईसह पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी येथे उष्ण आणि दमट वातावरणाचा इशारा अद्ययावत करण्यात आला. बुधवारपासून दमट वातावरणामुळे होणारा त्रास कमी होईल अशी शक्यता आहे. मात्र, कमाल तापमानाच्या पाऱ्यामध्ये चढउतार होत राहतील, अशीही शक्यता आहे.


जागतिक हवामान बदलाच्या काळामध्ये एकाच जिल्ह्यातील वेगवेगळ्या ठिकाणीही वेगवेगळे वातावरण अनुभवायला मिळते. मुंबईसारख्या जिल्ह्यामध्ये एखाद्या ठिकाणी खूप पाऊस पडतो, त्याचवेळी दुसऱ्या ठिकाणी पावसाचा फारसा तडाखा बसत नाही, असेही आढळून आले आहे. त्यामुळे स्थानिक हवामानाचा अंदाज आवश्यक असतो. या पार्श्वभूमीवर, केंद्राच्या पृथ्वी विज्ञान मंत्रालय आणि भारतीय हवामान विभागातर्फे ‘कृत्रीम प्रज्ञे’वर (एआय) आधारित दोन विशेष प्रणालींचे लोकार्पण करण्यात आले.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---